Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरशिवशाही बस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक..- नागपूर-अमरावती मार्गावरील चित्तथरारक घटना; प्रवाशांचा जीव...

शिवशाही बस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक..- नागपूर-अमरावती मार्गावरील चित्तथरारक घटना; प्रवाशांचा जीव टांगणीला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर:- कित्तेक वेळाआगारातून बस निघण्यापूर्वी देखभाल दुरुस्ती कडे महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने कधी रस्त्यातच बसचे बिघाड होते; तर कधी कोणती अनुचित घटना होणार याचा काही नेम नाही.त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला येऊन खासगी प्रवास सुखकर असल्याची प्रचिती हल्ली दिसून येत आहे.अशातच नागपूर-अमरावती मार्गावर आज ४ एप्रिल ला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून शिवशाही बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.बस जळून खाक होण्यापूर्वीच प्रसंगावधान साधत बस मधील १६ प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

नागपूर येथील गणेशपेठ आगारातून सकाळी ९ च्या सुमारास शिवशाही बस नागपुरातून अमरावतीला निघाली होती. शिवशाही बस नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळ आली असता सदर बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आग लागताच बसमधील १६ प्रवाशी पटापट खाली उतरू लागले.प्रवाशी खाली उतरताच बसणे रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस जळून खाक झाली.बसणे पेट घेताच बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!