Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीशासकीय इतमामात शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण.. -सहपालकमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन..

शासकीय इतमामात शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण.. -सहपालकमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करतांना वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज,बुधवार १२ फेब्रुवारीला त्यांच्या गावी अनखोडा (ता.चामोर्शी) येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली.आमदार डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीस मुख्यालयात मानवंदना👇
तत्पूर्वी,आज सकाळच्या सुमारास गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना पोलीस मानवंदना देण्यात आली.यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल ऑपरेशन) राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,उपमहानिरीक्षक अंकित गोयल,पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच सीआरपीएफचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नक्षलविरोधी कारवाईत वीरमरण👇
भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात सी-६० जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती.मात्र,या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली.उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!