Monday, July 13, 2026
Homeनागपूरशाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता..

शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेने कहर केला आहे.राज्यातील अनेक शहरांवर सूर्य आग ओकत असून विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर काल शुक्रवारी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.येथील तापमान ४७.२ अंश सेल्सिअस एवढे विक्रमी तापमान नोंदवण्यात आले.त्याचबरोबर, वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता.याठिकाणी ४७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली,तर अमरावती-४६.४,चंद्रपूर-४६.४,गडचिरोली-४६.०,नागपूर-४५.७,यवतमाळ-४५.४,गोंदिया-४४.९०,अकोला-४४.८०,वाशिम-४२.६,भंडारा-४२.०,जळगाव-४१.९,छत्रपती संभाजीनगर-४१.४,परभणी-४१.३,बुलडाणा-४१.०,बीड-४०.५,धाराशिव-३८.६,सोलापूर-३६.८,नाशिक-३६.३ आणि मुंबई-३४.५ इत्यादी तापमान नोंदवल्या गेले. अश्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.तसेच अकोला,अमरावती व वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या पार्श्वभूमीवर आज,शनिवार २३ मे रोजी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळांच्या सुट्ट्यांत वाढ करण्याचे संकेत दिलेत.मंत्री पंकज भोयर याविषयी बोलतांना म्हणाले की,तापमानात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे.१० जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट सुरू राहिली तर विदर्भात १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा या २६ जूनपासून सुरू करण्यावर सरकार विचार करेल. शालेय शिक्षण विभाग लवकरच या प्रकरणी बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे.या प्रकरणी लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.नागपूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जातील.तसेच केंद्रांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.असे मंत्री भोयर यांनी स्पष्ट केल्याने वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!