Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीव्यावसायिकांकडून लाखो रुपयांच्या हव्यासापोटी नियमांना तिलांजली.. - विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय...

व्यावसायिकांकडून लाखो रुपयांच्या हव्यासापोटी नियमांना तिलांजली.. – विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कुठलाही व्यवसाय करायचा असेल,तर त्यासाठी एफडीए(अन्न व औषध प्रशासन)व नगरपरिषद,नगरपंचायत वा ग्रामपंचायत या ठिकाणी नोंदणी करणे अनिवार्य आहे.व्यवसाय करतांना कुठल्या नियमांचे पालन केले पाहिजे,यासंदर्भात काही नियमही ठरवून दिलेले आहे.मात्र,सर्व नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले आहेत.
कुठल्याही चौकात जा,त्याठिकाणी अतिक्रमण करून ठिकठिकाणी उघड्‌यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या लावलेल्या निदर्शनास येतात.शहरात या व्यवसायातून दररोज लाखो रुपये कमावले जातात. तथापि,जनआरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.लाखो रुपयांच्या या व्यवसायापोटी सर्व नियमांना व्यावसायिकांकडून तिलांजली दिली जात असल्याचे वास्तव आहे.त्या ठिकाणी दूषित पाण्याचा वापर ग्राहकांना पिण्याकरिता केला जातो.स्वच्छता पाळली जात नाही.ज्याठिकाणी अन्नपदार्थ तयार केले जातात.तेथे पाळीव प्राण्यांचा संचार असतो.प्लेट धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा स्वतंत्ररित्या वापर केला जात नाही.तसेच बेसिंगची स्वतंत्र व्यवस्था नसते. एफडीएने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे; असे व्यवसायासाठी नोंदणी करतांना किंवा परवाना घेतांना नियमावली ठरवून दिलेली असते.मात्र,या नियमावलीचे कुठेच पालन होत नाही.बहुतांश प्रकरणात व्यवसायाची नोंदणी व परवानाही नसतो. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!