Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरवर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख आज नागपुरात..

वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख आज नागपुरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरची १९ वर्षीय वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख हिचे फिडे महिला विश्व चॅम्पियन बनल्यानंतर आज,बुधवार ३० जुलै रोजी  नागपूरमध्ये रात्री ९ वाजताच्या सुमारास आगमन होणार आहे.महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान उंचाविणारी विलक्षण प्रतिभेची धनी दिव्याचे नागपूर विमानतळावर भव्य स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.दिव्याने सोमवारी बाटुमी (जॉर्जिया) येथे संपलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात सहकारी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिच्यावर शानदार विजय मिळवून प्रथमच जगज्जेतेपद पटकावले.त्यानंतर ती पहिल्यांदा नागपुरात परतणार आहे.दिव्याचे नागपुरात आगमन होताच मान्यवरांच्या हस्ते तिचे स्वागत करण्यात येईल,असे चेस असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष गिरीश व्यास आणि सचिव भूषण श्रीवास यांनी म्हटले आहे.
यावेळी एआयसीएफचे महासचिव देव पटेल, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके,आमदार कृष्णा खोपडे,आमदार प्रवीण दटके,आमदार विकास ठाकरे,आमदार डॉ.नितीन राऊत,आमदार संदीप जोशी,आमदार ॲड.अभिजित वंजारी,आमदार समीर मेघे यांच्यासह शहर भाजप अध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहणार आहेत.नागपुरातील सर्व बुद्धिबळ खेळाडू,पालक,अधिकारी,प्रशिक्षक,चाहते आणि बुद्धिबळप्रेमींनी दिव्याच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित राहावे,असे आवाहन श्रीवास यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!