- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-येत्या १२ मे रोजी बुद्धपौर्णिमा असून बुद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते.त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात. त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व प्राण्यांची गणना करतात.त्यावरून जंगलात कोणत्या प्रकारचे,किती प्राणी आहेत,याची माहिती वनविभागाला मिळते.सध्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव जंगल सफारी गेट परिसराची वेगळ्याच कारणाने चर्चा आहे.या भागात वाघीण आपल्या पाच बछड्यांसह(पिल्ले) वास्तव्याला आहे.ती परिसरात मुक्तपणे फिरत आहे.त्यामुळे, वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांचा ओढा गोठणगाव सफारी गेटकडे वाढला आहे.सर्व पर्यटकांना वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचे दर्शन होत आहे.आता त्यांनी मचाणाचाच ताबा घेतला आहे.याचा धस्का प्राणी मोजण्यासाठी रात्रभर मचाणावर थांबणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
- Advertisement -