Saturday, April 18, 2026
Homeनागपूरवनविभागाला पगार मिळतो; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे? - वाघाने...

वनविभागाला पगार मिळतो; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे? – वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्याच्या घडीला सर्वत्र मानव-वन्यजिव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.नागपूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो नागरिकांनी जीव गमावून कुणाचा आधारवड गेला तर,कुणाचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याचे चित्र आहे.अश्यातच काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना संरक्षण देण्या ऐवजी शेतात जाऊ नका,असा सल्ला देत आहेत. यावर शेतकरी संतप्त झाले आहेत.वनविभागाला पगार मिळतो आहे; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे?पिके वाळून जात आहेत.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आम्ही काय आता भीक मागायची कां?असा सवाल बसंती कोडवते आणि दुर्गेश कोडवते या शेतकरी मायलेकांनी उपस्थित केला आहे.नागपूर
जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघाने उच्छाद मांडला असून,नवेगाव येथील एका घटनेने शेतकरी हादरले आहेत.४७ वर्षीय बिरन मंगलू कोडवते यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने भीषण हल्ला केला.विशेष म्हणजे,वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात ठार केले.या घटनेमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघाच्या सततच्या वावरामुळे नवेगाव,वडंबा परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.यामुळे तूर,शेंगा यांसारखी उभी पिके वाळत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.पाण्याचे पाइप फुटले असून त्याची भरपाई देणार कोण?असा प्रश्न उभा ठाकला आहे.केवळ बैठकांचा फार्स न करता, वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी लालसिंग उईके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!