Saturday, June 20, 2026
Homeमुंबईलाडक्या बहिणींना दिलासा; पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही- मंत्री...

लाडक्या बहिणींना दिलासा; पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही- मंत्री आदिती तटकरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अपात्र लाभार्थीकडून पैसे परत घेण्याबाबतचा सरकारने निर्णय घेतलेला नाही; असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणूक संपल्यामुळे राज्य सरकार अपात्र बहिणीकडून पैसे परत घेणार असल्याच्या चर्चेचे तटकरे यांनी काल,बुधवारी खंडन केले.त्या म्हणाल्या,राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून या योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही.मात्र,लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत.मात्र,आतापर्यंत आम्ही एकाही महिलेचे पैसे माघारी घेतलेले नाहीत किंवा हे पैसे परत घेण्याविषयी कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
काही महिलांनी नोकरी,नवीन गाडीची खरेदी, परराज्यात स्थलातंर आदी कारणांनी योजनेसाठी अपात्र ठरत असल्याने पैसे माघारी करण्यासाठी स्वतःहून शासनाला अर्ज केलेले आहेत.दररोज पाच-सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत.आम्ही त्यांच्याशी संपर्क करून कुठलीही माहिती अजून मागवलेली नाही.
एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी खिडकी तयार करून देतील.तेथे हे पैसे जमा होतील.आम्ही कोणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही.ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील,असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.दरम्यान,अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून त्यांना दिलेल्या रकमेची वसुली करणार असल्याचे अदिती तटकरे यांनी मंगळवारीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!