- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील बाराही तालुक्यात शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकीत असल्याने मजुरांनी पोट कशाने भरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे निर्दयी सरकारने मजुरांची मजुरी तात्काळ अदा करावी, अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे केली असून,६ महिने झाले तरीही अजूनपर्यंत मजुरी मिळालेली नाही.शासनाकडून प्रत्येक मजुराला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत काम दिले जात आहे.परंतु,मजुरांनी काम केले असतांना मजुरी दिली जात नसेल तर काम करण्याचा उपयोग काय?रोजगार हमी योजनेंतर्गत मातीकाम,तलाव खोलीकरण, मजगी,एकेरिकरण,वृक्ष लागवड,घरकुल बांधकाम, जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम व इतर सार्वजनिक कामे मजुरांच्या वतीने करण्यात येतात. परंतु,सहा महिने लोटले असतांनाही आजपर्यंत रोजगार हमी योजनेची मजुरी मिळाली नसल्यामुळे मजूर चिंतेत पडले आहेत. मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.पंचायत समिती व तहसील स्तरावरून शासनाकडे मस्टर(हजेरीपत्रक) पाठवले जात असल्याचे सांगितले जात आहे.परंतु,६ महिन्यांपासून मजुरीचे पैसे कुठे अडकलेत? याचा काही थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांची रखडलेली मजुरी द्यावी,अशी मागणी ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
- Advertisement -