- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. शासनाने रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्या,मंगळवार १ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ग्राम रोजगार सेवकांचे पदनाम बदलून ग्राम रोजगार सहाय्यक करण्यात आले.तसेच एकत्रित मानधन, एकत्रित प्रवास भत्ता ३ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार १ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झाला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त नागपूर यांनी २१ ऑक्टोंबर २०२४ व १९ मार्च २०२५ ला मानधन वितरणाबाबत मार्गदर्शन मागविले आहे.परंतु अजूनही राज्य शासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले नाही.मागील सहा महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवक, सहाय्यकांना मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.या विषयाची गंभीरता लक्षात घेता शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी,अन्यथा ३१ मार्च २०२५ पर्यंत ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधन वितरण प्रक्रियेबाबत अंमलबजावणी न झाल्यास १ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल व शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या अपूर्ण कामांमध्ये हयगय व नुकसान झाल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील,असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना ग्राम रोजगार सेवक संघटनेचे महासचिव राजेंद्र जिचकार,उपाध्यक्ष वासुदेव गोतमारे, राहुल शेंडे,धीरज अंजनकर,रामगोपाल ढोबळे,मिलिंद मांगे,राहुल गजभिये,राहुल चिमोटे,श्याम डाखोळे, रामेश्वर शेटे आदी उपस्थित होते.
- Advertisement -

