Tuesday, July 28, 2026
Homeब्रम्हपुरीरेती वाहतुकीवर शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पावित्रा - ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील घटना...

रेती वाहतुकीवर शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पावित्रा – ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत मार्गावरून जाणाऱ्या रेतीचे ट्रक,ट्रॅक्टरची अडवणूक केली.तालुक्यातील रणमोचन रेतीघाटाचा लिलाव झाला असल्याने रेतीघाटावरून दररोज ४० ते ५० ट्रक,ट्रॅक्टर रेती भरून रनमोचन गावाकडून खरकाडाकडे जात असतात.शेती वाहतुकीच्या रस्त्यावरून रेतीने भरलेले मोठे ट्रक,ट्रॅक्टर दिवस-रात्र वाहतूक करीत आहेत.वाहनांची धूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांवर बसत असल्याने शेतात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

सदर नुकसानीबाबत रेती घाट व्यवस्थापनाला वारंवार सूचना देऊनही यावर तोडगा न निघाल्याने शेवटी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.यामुळे रेती भरलेल्या ट्रक,ट्रॅक्टर यांच्या रांगाच-रांगा लागलेल्या होत्या.शेतकरी बांधवांच्या शेतातील होणाऱ्या पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी;अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!