- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील २९ महानगरपालिकांचे आज,शुक्रवार १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षच मोठा भाऊ ठरल्याचे दिसून येत आहे.भाजपने विरोधकांना मागे टाकत तब्बल २१ महापालिकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.भाजपने केवळ जागाच जिंकल्या नाहीत,तर राज्यातील महत्त्वाची आर्थिक आणि राजकीय केंद्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत,मुंबईमध्ये शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने मुंबईवर कब्जा केला आहे.तर पुणे,नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमधील आपली सत्ता भाजपने यशस्वीपणे कायम राखली आहे.भारतीय जनता पक्षाने मुंबई,नवी मुंबई,मीरा भाईंदर,उल्हासनगर, पनवेल,पुणे,पिंपरी चिंचवड, इचलकरंजी,सांगली,मिरज कुपवाड,कोल्हापूर,सोलापूर, नागपूर,अकोला,अमरावती,नाशिक,धुळे,जळगाव, अहिल्यानगर(अहमदनगर),जालना,नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर इत्यादी महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली आहे.अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे.या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे.त्यातच, काँग्रेसला केवळ ३ महानगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे.यामध्ये लातूर,भिवंडी-निजामपूर व चंद्रपूर इत्यादींचा समावेश आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे,तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे.बहुजन विकास आघाडीने आपले अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे.तर मालेगाव महानगरपालिकेचा निकाल मात्र पेचात अडकला आहे.येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता अपक्षांच्या हाती आहेत.
- Advertisement -

