Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाराजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे...

राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे असला पाहिजे- नितीन गडकरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-केंद्र व राज्य शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर केली जातात,पण अनेक ठिकाणी नेतेच कंत्राटदार झाल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे.ही स्थिती सर्वच पक्षात असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते.राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे हा नसून,त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे हा असला पाहिजे. राजकारणाचा अर्थ राष्ट्र कारण असायला हवा.देशात सुशासन असायला हवे,असे परखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल,शुक्रवारी ८  गोंदिया येथे आयोजित सभेत केले.
महायुतीतील गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पुराम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.ना.नितीन गडकरी म्हणाले की,देशाला,राज्याला विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. मतदारांनी सुद्धा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो,कोण सक्षम नेतृत्व करू शकतो,या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करण्याची गरज आहे.योग्य नेतृत्व मिळाले,तर निश्चितच त्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही.देशाला योग्य नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तीन-चार वर्षांपूर्वीच गोंदिया ड्रायपोर्ट तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.या प्रकल्पाची फाइल तयार होऊन पडली आहे.पण, जागा उपलब्ध न झाल्याने ड्रायपोर्ट तयार झाला नाही. त्वरित जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाचे काम सुरू होईल.त्यामुळे गोंदिया येथून विविध देशांत तांदूळ निर्यात करण्यास मदत होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील,असे सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!