नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर पुढील मे आणि जून महिन्यात काय अवस्था होणार?सांगणे कठीण आहे.अश्यातच हवामान विभागाने आज,सोमवार २७ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानंतर,उद्या २८ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी ढगाळ वातावरण राहणार.विशेष म्हणजे,काल रविवारी नागपूरचे तापमान ४५.४ अंशांच्या उच्चांकीवर पोहोचले व तीव्र उन्हामुळे नागरिकांची त्वचा भाजते की काय,अशी जाणीव झाली.त्यातच,वाढत्या तापमानाचे गंभीर परिणाम दिसत असून बसने प्रवास करणाऱ्या एका वृद्धाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी उघडकीस आली.लग्नसमारंभ असल्याने दुपारच्या सुमारास बसने काटोल येथे जायला निघाले. पण,रखरखत्या उन्हामुळे त्यांना बसमध्येच अस्वस्थ वाटू लागले.मात्र,त्यांनी हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. बस काटोल शहरातील बसस्थानकाच्या आवारात पोहोचताच ते निपचत पडून असल्याचे दिसताच काही प्रवाशांना शंका आल्याने त्यांनी काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. लक्ष्मण अमृत पाटील वय ७५ वर्षे,रा.मांडवी,ता. कळमेश्वर,जि.नागपूर असे मृत प्रवाशाचे नाव आहे.यावरून रखरखत्या उन्हात बाहेर न पडलेले बरे.काल रविवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यात खतरनाक तापमानाची नोंद करण्यात आली.तापमानात अग्रस्थानी अकोला जिल्हा ठरला. अकोला-४६.९०,अमरावती-४६.८०,वर्धा-४६.
उन्हाळ्याची परिस्थिती लक्षात घेता,सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी.

