उद्रेक न्युज वृत्त :-लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली.परंतु,या योजनेत तब्बल ४ हजार ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरद पवार गट)खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.सुप्रिया सुळे यांच्या मते,कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या पद्धतीने पुरुषांच्या खात्यात वर्ग झाले आहेत.या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी करत सुळे यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.त्यांच्या मते,योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक असतांना,पुरुषांच्या खात्यात पैसे कसे जमा झाले,हा मोठा प्रश्न आहे.“महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे.अशा परिस्थितीत कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या व्यक्तींकडे गेले,याची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी)व्हायला हवी,” असे सुळे यांनी ठणकावले. लाडकी बहीण योजनेचे २६ लाख अर्ज फेटाळण्यात आले आहेत.पहिल्या टप्प्यात २६ लाख अर्ज कां फेटाळले गेले नाहीत? योजनेसाठी वापरले गेलेले सॉफ्टवेअर कोणते होते आणि त्यात त्रुटी का आल्या? सुळे यांनी या घोटाळ्याला ‘लहान’ नसून,अत्यंत गंभीर बाब मानली आहे. “हा ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा आहे. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक असतांना पुरुषांच्या खात्यात पैसे जमाच झाले कसे? – लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा- खासदार सुप्रिया सुळे
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

