Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,चामोर्शी शहरातील बाल विवाहास घातला आळा- बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व...

मोठी बातमी,चामोर्शी शहरातील बाल विवाहास घातला आळा- बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व पोलीस प्रशासन चामोर्शी यांची कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – जिल्ह्यातील चामोर्शी तालुका शहरामध्ये आज १० मार्च २०२३ रोजी बालविवाह होणार असल्याची गुपित माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना मिळताच लगेच त्यांनी सदर घटनेची माहिती गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांना दिली.जिल्हा बाल संरक्षण व पोलीस पथक यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाह स्थळास भेट देऊन बालविवाहास आळा घालण्यात आला.मुलाची व मुलीचे जन्म पुरावा तपासणी करून  बालीका १८ वर्षाखालील आणि मुलगा २१ वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व मुलाचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.

मुलीकडचे व मुलाकडचे दोन्ही मंडळी नागभिड तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते चामोर्शी शहरात फेब्रुवारी  महिन्यात रोजगाराच्या शोधात कामाकरिता (भटकंती जमात) आले होते. एक दिवसा आधी त्यांनी हळदीचा कार्यक्रम पार पाडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वधू व वरांकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत बालविवाह चामोर्शी येथे होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली असल्याने त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी सदर बालिकेच्या तात्पुरता स्वरूपात राहणाऱ्या ठिकाणी त्यांचे घर गाठून मुलीच्या आई वडिलांकडून मुलीचे १८ वर्ष व मुलाचे २१ वर्ष पूर्ण होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही.असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे व मुलाचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले  यांचे उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्या नुसार होणारी कारवाई बाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,  पोलीस स्टेशन चामोर्शीच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ,बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस जीवन हेडावू, सामाजीक कार्यकर्ते जयंत जथाडे,क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार यांनी कार्यवाही केली.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर १०९८  वर बाल विवाह बाबत संपर्क करावे;असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!