Tuesday, March 18, 2025
Homeनागपूरमोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी - नागपूर पोलीसांनी...
spot_img

मोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी – नागपूर पोलीसांनी आरोपींना केली अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मागील महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर ६ अल्पवयीन मुलांसमवेत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.त्यानुसार यांना आरपीएफ आणि ‘बचपन बचाओ संस्थे’च्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.या प्रकरणात मानवी तस्करी करून ही सर्व मुले बिहारमधून आणल्याचे लोहमार्ग पोलिसांनी तपासादरम्यान उघड केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी शंभू आणि विकास नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या मुलांचे चाइल्ड लाइन टीमकडून समुपदेशन केले जाणार आहे.तसेच त्यांची कागदपत्रे तपासून त्यांचे नेमके वय जाणून घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

आरोपींनी मुलांच्या नातेवाईकांना भुरळ घालून सुरुवातीला ५०० ते १००० रुपये देऊन पेपर मिलमध्ये काम करण्यासाठी मुलांना नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी करण्यात आली व नंतर ही मुले अन्य टोळीतील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आली होती.मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना महिन्याला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवायचे व मुलां कडून मजुरीची कामे करवून घेतली जात होती.मुलांची तस्करी प्रकरणी मुख्य म्होरक्या कोण?याचा  पोलीस शोध घेत आहेत.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!