Friday, November 7, 2025
Homeनागपूरमोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी - नागपूर पोलीसांनी...

मोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी – नागपूर पोलीसांनी आरोपींना केली अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मागील महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर ६ अल्पवयीन मुलांसमवेत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.त्यानुसार यांना आरपीएफ आणि ‘बचपन बचाओ संस्थे’च्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.या प्रकरणात मानवी तस्करी करून ही सर्व मुले बिहारमधून आणल्याचे लोहमार्ग पोलिसांनी तपासादरम्यान उघड केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी शंभू आणि विकास नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या मुलांचे चाइल्ड लाइन टीमकडून समुपदेशन केले जाणार आहे.तसेच त्यांची कागदपत्रे तपासून त्यांचे नेमके वय जाणून घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

आरोपींनी मुलांच्या नातेवाईकांना भुरळ घालून सुरुवातीला ५०० ते १००० रुपये देऊन पेपर मिलमध्ये काम करण्यासाठी मुलांना नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी करण्यात आली व नंतर ही मुले अन्य टोळीतील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आली होती.मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना महिन्याला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवायचे व मुलां कडून मजुरीची कामे करवून घेतली जात होती.मुलांची तस्करी प्रकरणी मुख्य म्होरक्या कोण?याचा  पोलीस शोध घेत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!