- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा,दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा देण्यात यावी,अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी) चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.पंतप्रधान मोदी यांनी काल रविवारी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली.यावेळी त्यांनी गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.याप्रसंगी भदंत ससाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली.तसेच मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे.या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती.या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती.तेथील १९४९ बीटी ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे.तसेच दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांसाठी जागा अपुरी पडत आहे.भविष्याचा विचार करता माता कचेरी,कॉटन रिसर्च सेंटर येथील २१ एकर जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी.याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक,स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. राजेंद्र गवई, आनंद फुलझेले, एन. आर. सुटे, दादाराव दाभाडे उपस्थित होते.
- Advertisement -

