- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्य निवडणूक आयोगाने आज,सोमवार १५ डिसेंबरला राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुंबईच्या मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, येत्या २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल.त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल.२ जानेवारी २०२६ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल,तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल.त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान,तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी मत मोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका मागील सात ते आठ वर्षांपासून किंवा त्याहून अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात,असे न्यायालयाने स्पष्ट केले असले तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

