- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती दिल्याने आज,मंगळवार २ डिसेंबर रोजी राज्यातील एकूण २८८ पैकी २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास दहा वर्षांच्या कालखंडानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये या निवडणूक प्रक्रियेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यातच विरोधकांनी सत्ताधारी पक्षांसह राज्य निवडणूक आयोगावर बोगस मतदानाचे आरोप केल्यामुळे राजकारण तापले आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात २ बोगस मतदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.हे दोघेही दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न करत होते.पण,निवडणूक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि ते अलगद जाळ्यात अडकले.आज बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.त्यानंतर दीड तासातच प्रभाग क्रमांक-१५ मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला.त्यात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याच्या कोथळा येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला.पण,हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने हे मतदान टळले.त्याच्यासोबत अन्य एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.दुसरीकडे, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोथळी व इब्राहिपूर येथून अनेक लोक बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे.बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नाने आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- Advertisement -

