उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- सतत वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे लहानांपासून ते थोरांपर्यंत खोकला,सर्दी होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.आजार बळावल्याने दवाखान्यात सध्या गर्दी दिसत आहे. दिवसा उकाडा व रात्रीच्या सुमारास गारवा जाणवत असल्याने रोग प्रतिकारशक्ती क्षीण होत आहे.वारंवार हवामान बदलत असल्याने आजारांना पोषक वातावरण मिळत आहे.सर्दी, खोकला,घशात तापाची लक्षणे आढळणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.तसेच दम्याचा त्रासही वाढला आहे.घसा खवखवणे,नाक चोंबणे, सर्दी यासारखे आजार बळावत आहेत.वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी वेळीच काळजी घेऊन रोग प्रतिकार क्षमता वाविण्यासाठी योग्य ते घरगुती उपाय वा औषधोपचार करावा.

