Friday, April 17, 2026
HomeUncategorizedबँकेतील कर्मचारी एकाच वेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत...-जाणून घ्या आपले अधिकार

बँकेतील कर्मचारी एकाच वेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत…-जाणून घ्या आपले अधिकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

एखादा बैंक कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली तुमचे काम ताटकळून ठेवतअसेल, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध बँकेतील तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवू शकता.त्याची दखल घेतली जात नसेल तर व्यवस्थापक, नोडल अधिकाऱ्यांकडेही तक्रार करता येते. शिवाय, प्रत्येक बँकेत निवारण मंच असतात. या मंचाचा फोन नंबर, ई-मेल आयडी तुम्ही बँकेकडून मिळवू शकता. 

बँकेच्या ‘कस्टमर केअर’ला कॉल करून हा नंबर मिळवता येऊ शकतो.बँकेने महिनाभरापर्यंत तक्रारीची दखल न घेतल्यास बँकिंग लोकपालांकडे अपिलात जाता येते.कुठलीही बँक अगर त्या बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली ग्राहकांना ताटकळत ठेवू शकत नाहीत. माहितीच्या अधिकारात स्वतः रिझर्व्ह बँकेने ही माहिती सार्वजनिक केली आहे.बँकेतील कर्मचारी एकाचवेळी जेवणाची सुट्टी घेऊ शकत नाहीत.एकेकाने सोयीनुसार अशी सुट्टी घ्यावयाची असते. बँकेच्या कामकाजाच्या एकूण संपूर्ण वेळात सामान्य व्यवहार हा सुरूच राहिला पाहिजे. 

कर्ज नाकारण्याचे कारण द्या-

तुमच्या कर्जाचा अर्ज कारण नमूद केल्याशिवाय बँक रद्द करू शकत नाही.तसे बँकेने केल्यास तुम्ही तक्रार करू शकता.

हेही जाणून घ्या….

बँकेकडून ‘चेक कलेक्शन’मध्ये विलंब झाल्यास बँकेला ग्राहकास भरपाई द्यावी लागेल.खात्यात बॅलन्स नसल्याने ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस) फेल झाल्यास ग्राहक म्हणून तुम्हाला दंड भरावा लागेल. तुम्ही देशातील कुठल्याही बँकेत फाटक्या, जुन्या नोटा बदलू शकता. कुठलीही बँक तुम्हाला त्यासाठी नकार देऊ शकत नाही. तुमच्याकडून दिल्या गेलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस इन्स्ट्रक्शन्स मध्ये बँकेकडून विलंब झाल्यासही ग्राहक म्हणून तुम्हाला भरपाई मिळेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!