Monday, March 17, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तबँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना....!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय...
spot_img

बँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना….!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय करतात? घ्या जाणून…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या परिस्थितीत असा एकही व्यक्ती सापडणार नाही की,ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही.लहानांपासून तर वयोवृद्ध यांची बँक खाती असतातच.बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित मानले जाते. काबाळकष्ट करून व पोटाची आतडी मारून लोक बँकेत पैसा ठेवतात.अशातच काहीजण बँकेत तर पैसा ठेवतात; मात्र त्यांना माहितीच नसते किंवा आठवण येते किंवा नाही की,आपला बँकेत पैसा आहे.कितीतरी वर्षे उलटूनही काहीजण ठेवलेल्या पैशाला हात लावत नाही.अशीच बाब निदर्शनास आली असून नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम ३५ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फेब्रुवारी मध्ये दिली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी संसदेत दिली आहे.

खरे म्हणजे असे पैसे ज्यांच्यावर कुणीही दावा केलेला नाही.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला लिखित स्वरुपात ही माहिती दिली.सदर ३५,०१२ कोटी रुपयांचा कोणीही दावेदार नसलेली सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेत आहे.स्टेट बँक ऑफ इंडियात असे ८,०८६ कोटी रुपये आहेत.तर पंजाब नॅशनल बँकेत असे ५,३४० कोटी रुपये आहेत. कोणीच दावा न केलेले ४,५५८ कोटी रुपये कॅनरा बँकेमध्ये आहेत तर बाकीची. रक्कम इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बचत आणि चालू खात्यात असलेल्या रकमेबद्दल १० वर्षे कोणीही विचारणा न केल्यास ती रक्कम ‘दावा न केलेली रक्कम’ मानली जाते. अनेक जण बँकेत ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतात. त्याला मुदत ठेव मानले जाते.ठराविक कालावधी संपल्यानंतर १० वर्षांनंतरही त्या रकमेवर दावा करण्यास कोणीही पुढे न आल्यास त्या रकमेला ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ समजले जाते.सदर रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयनेस फंडा’त जमा केली जाते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

आजपासून ते २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी,...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!