Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना....!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय...

बँकांना ३५ हजार कोटी रुपयांचा वालीच सापडेना….!- पैश्याचा वाली नसल्यास बँका काय करतात? घ्या जाणून…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या परिस्थितीत असा एकही व्यक्ती सापडणार नाही की,ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही.लहानांपासून तर वयोवृद्ध यांची बँक खाती असतातच.बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित मानले जाते. काबाळकष्ट करून व पोटाची आतडी मारून लोक बँकेत पैसा ठेवतात.अशातच काहीजण बँकेत तर पैसा ठेवतात; मात्र त्यांना माहितीच नसते किंवा आठवण येते किंवा नाही की,आपला बँकेत पैसा आहे.कितीतरी वर्षे उलटूनही काहीजण ठेवलेल्या पैशाला हात लावत नाही.अशीच बाब निदर्शनास आली असून नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम ३५ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला फेब्रुवारी मध्ये दिली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी संसदेत दिली आहे.

खरे म्हणजे असे पैसे ज्यांच्यावर कुणीही दावा केलेला नाही.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला लिखित स्वरुपात ही माहिती दिली.सदर ३५,०१२ कोटी रुपयांचा कोणीही दावेदार नसलेली सर्वाधिक रक्कम स्टेट बँकेत आहे.स्टेट बँक ऑफ इंडियात असे ८,०८६ कोटी रुपये आहेत.तर पंजाब नॅशनल बँकेत असे ५,३४० कोटी रुपये आहेत. कोणीच दावा न केलेले ४,५५८ कोटी रुपये कॅनरा बँकेमध्ये आहेत तर बाकीची. रक्कम इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बचत आणि चालू खात्यात असलेल्या रकमेबद्दल १० वर्षे कोणीही विचारणा न केल्यास ती रक्कम ‘दावा न केलेली रक्कम’ मानली जाते. अनेक जण बँकेत ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवतात. त्याला मुदत ठेव मानले जाते.ठराविक कालावधी संपल्यानंतर १० वर्षांनंतरही त्या रकमेवर दावा करण्यास कोणीही पुढे न आल्यास त्या रकमेला ‘अनक्लेम्ड डिपॉझिट’ समजले जाते.सदर रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयनेस फंडा’त जमा केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!