Sunday, April 26, 2026
Homeगडचिरोलीप्री-मान्सून कालावधीत मलेरिया निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा.. -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...

प्री-मान्सून कालावधीत मलेरिया निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा.. -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा हा जंगलयुक्त, आदिवासी व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे मलेरिया आजारासाठी संवेदनशील(एन्डेमिक)क्षेत्र म्हणून ओळखला जातो.विशेषतः पावसाळ्यानंतर डासांची वाढ वेगाने होत असल्याने मलेरियाचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण, रक्त तपासणी,औषधोपचार व कीटकनाशक फवारणीसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून,चालू वर्षात मलेरिया नियंत्रणात सकारात्मक घट दिसून येत आहे.तथापि, दुर्गम भागातील जागरूकतेचा अभाव व भौगोलिक अडचणी लक्षात घेता सातत्याने दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्हा परिषद, गडचिरोली येथे व्यापक जनजागृती व आढावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधुरी किलनाके,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरेश तिवारी,सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके तसेच जिल्हा व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल(VBDC) सल्लागार राजेश कार्लेकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुजाता वाढीवे यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
  • “Test,Treat,Track” धोरणावर भर👇
मार्गदर्शन करताना सीईओ सुहास गाडे म्हणाले, “प्री-मान्सून कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे.मलेरिया नियंत्रणासाठी ‘Test,Treat,Track’ या धोरणानुसार प्रत्येक संशयित रुग्णाची त्वरित तपासणी व उपचार सुनिश्चित करणे आवश्यक आहे.” ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका मलेरिया निर्मूलनात अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर👇
मलेरिया प्रतिबंधासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे,नियमित कीटकनाशक व धूर फवारणी करणे, कीटकनाशकयुक्त मच्छरदाणी(LLIN)चा वापर करणे, ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी करून योग्य उपचार घेणे तसेच अंगावर पूर्ण कपडे परिधान करून डासांपासून संरक्षण करणे या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी सहकार्य करून सर्वेक्षणात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले.
  • जनजागृती रॅली व कर्मचाऱ्यांचा गौरव👇
कार्यक्रमादरम्यान मलेरिया नियंत्रणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच नर्सिंग विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत काढलेल्या जनजागृती रॅलीमुळे परिसर जागरूकतेने दुमदुमून गेला. “मलेरिया टाळा – जीवन वाचवा”, “स्वच्छ परिसर, निरोगी जीवन” अशा संदेशांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून मलेरिया प्रतिबंध,नियंत्रण व निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली. “मलेरिया मुक्त गडचिरोली” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. – अन् काही वेळातच ‘टी-८४’ वाघिणीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या...

दोन बहिणींच्या बँक खात्यावर ठेवले स्वतःचे नियंत्रण अन् तब्बल ४८ लाखावर मारला डल्ला.! – ठगबाज निघाला कुरखेडा तालुक्यातील..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका ठगबाजाने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन बहिणींची तब्बल ४८ लाखाहून अधिकच्या रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला...

उद्यापासून कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर..

उद्रेक न्युज वृत्त :-अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि कृषी केंद्र चालकांची होणारी कुचंबणा याविरोधात राज्यातील कृषी केंद्र चालक...

नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील संपूर्ण नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणू,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते.त्यानुसार पावले उचलण्यात आली.जे जंगल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!