Thursday, July 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील ३ वर्षात नक्षलवादापासून होणार मुक्त-केंद्रीय गृहमंत्री अमित...

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील ३ वर्षात नक्षलवादापासून होणार मुक्त-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गत ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सीएपीएफच्या सुविधांसाठी अनेक पावले उचलली आहेत.मग ती सीआरपीएफ असो किंवा सीमेवर तैनात असलेल्या इतर सर्व संघटना.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील ३ वर्षात नक्षलवादापासून मुक्त होईल; असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.ते आसाममध्ये कार्यक्रमाला संबोधित करत होते.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तेजपूर येथील एसएसबी कॅम्पसमध्ये सशस्त्र सीमा बलच्या ६० व्या स्थापना दिनाला हजेरी लावली.

शाह पुढे म्हणाले,भारत-चीन युद्धानंतर एसएसबीची स्थापना १९६३ मध्ये झाली आणि जेव्हा अटलजींनी ‘एक सीमा एक बल’ धोरण लागू केले तेव्हा २००१ पासून एसएसबी फोर्स कार्यरत आहे.भारत- नेपाळ सीमा आणि भारत-भूतान २००४ पासून सीमेचे कर्तव्यदक्ष रक्षण करत आहेत.नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यात एसएसबीच्या शौर्याचे कौतुक करताना शाह म्हणाले, सीआरपीएफ आणि बीएसएफसह एसएसबीने नक्षलवादी चळवळ संपवली आहे. एसएसबीने नेपाळ आणि भूतान या मित्र देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासोबतच छत्तीसगड,झारखंड आणि बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध लढा दिला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील एसएसबीने सीआरपीएफ, बीएसएफ,जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करासह दहशतवाद्यांविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे.

सरकारने एसएसबीच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त टपाल तिकीट जारी केले आहे.यामुळे देशातील जनतेसमोर एसएसबीचे कर्तव्याचे समर्पण नेहमीच जिवंत राहील.शाह पुढे म्हणाले,भारत आता संपूण जगात मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे.आपला देश २०४७ मध्ये संपूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून समोर येईल.असेही त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!