Friday, April 10, 2026
Homeनागपूरनिवांत झोपलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागताच चवताळून चढवला हल्ला..!

निवांत झोपलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागताच चवताळून चढवला हल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वन्य प्राण्यांचे जंगल मानवी वस्त्यांत रूपांतरित होऊ लागल्याने वन प्राण्यांच्या भटकंतीत वाढ झालेली दिसून येत आहे.विशेष म्हणजे,ज्यांच्या घरावर आपण कब्जा करणार,असा मनुष्य वा प्राणी आपले हक्क मुळीच सोडणार नाही.त्यामुळे वाघ, अस्वल, बिबट्या व इतर हिंस्त्र प्राण्यांचा मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळलेला दिसून येतो.अश्यातच गावापासून हाकेच्या अंतरावर शेतात असलेल्या घराच्या छपरीत (ओसरीत) दाराच्या आड झोपून असलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागला आणि त्याने चक्क शेतकऱ्यावर हल्ला चढविला.यात शेतकऱ्याच्या छाती व पाठीवर गंभीर दुखापत झाली.आतील दार बंद असल्याने घरातील मंडळी सुदैवाने बचावली असल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील खंडाळा (पिपरी) शिवारात काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली. कैलास परसराम गभणे वय ३९ वर्षे,रा.खंडाळा-पिपरी,ता.मौदा, जि.नागपूर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कैलास गभणे यांची शेती गावापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे.मागील काही वर्षापासून कुटुंबीयांसह शेतातील घरात राहतात.धानाच्या रोवणीसाठी चिखलणी करायची असल्याने ते काल रविवारी सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून जागे झाले आणि आंघोळीसाठी पाणी गरम करायचे असल्याने ते घराचे मुख्य दार उघडत छपरीत गेले. दाराशेजारी खुर्ची होती व खुर्चीच्या बाजूला ओसरीत बिबट्या झोपून होता.कैलास यांचा अनवधानाने खुर्चीला धक्का लागला.खुर्चीचा धक्का लागताच बिबट्या चवताळून उठला व त्याने कैलासवर हल्ला चढविला.दोनदा झडप मारल्याने ते खाली कोसळले व आरडाओरडा करू लागले.त्यामुळे बिबट्या पळून गेला.मात्र,हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. श्रीधर गभणे यांनी त्यांना मौदा तालुक्याच्या धानला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.माहिती मिळताच मौदाचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या सूचनेवरून ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते,माजी पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर,ठाणेदार स्नेहल राऊत,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील सोनवणे,वन विभागाचे श्रावण अडमाची यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घटनेच्या वेळी कैलासची पत्नी व इतर सदस्य घरात झोपले होते.कैलास यांनी घराबाहेर पडताच दार बंद केले होते.त्यामुळे बिबट्याला आत शिरणे शक्य झाले नाही.त्यामुळे घरातील मंडळी सुरक्षित राहिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११...

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!