Monday, May 18, 2026
Homeगडचिरोलीनावांमध्ये व चुकीचे खात्यांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित - शेतकऱ्यांना तातडीने मदत...

नावांमध्ये व चुकीचे खात्यांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित – शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- आमदार डॉ.देवराव होळी यांची विधासभेत मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. परंतु नावांमध्ये व खात्यांच्या अंकामध्ये झालेल्या चुकामुळे अजूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.या शेतकऱ्यांना शासन तातडीने मदत करणार का? असा प्रश्न आमदार डॉ. देवराव होळी यांनी लक्षवेधीतील चर्चेत सहभागी होऊन राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केला.

यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.तसेच वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली जाईल,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी सभागृहाला दिले. कर्जमाफी झाली त्यावेळेस देण्यात आलेल्या खात्याच्या नावात अंकात, बँकेकडून, प्रशासनाकडून चुका करण्यात आल्या.मात्र त्या चुकांची मोठी किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागत आहे.अजुनपर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.त्यासाठी सरकारने गंभीर होऊन लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लवकरात लवकर अशा चुका दुरुस्त करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी शासनाला केली आहे.

गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भटक्या जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.ही जमात अत्यंत गरीब असून हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांना राहण्यासाठी घर देखील नाही.त्यामुळे त्यांना घरकुल देण्यासंदर्भात शासन स्तरावर आलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करणार का व त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? असा प्रश्न आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्याचे इतर मागासवर्गीय मंत्री अतुल सावे यांच्याकडे लक्षवेधी प्रश्नांच्या चर्चेप्रसंगी केला. यावेळी मंत्री सावे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला असून अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती दिली. शासन स्तरावरील सर्व प्रस्ताव लवकरच मंजूर करून त्यांना योग्य पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी उत्तरादरम्यान सभागृहाला दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!