Monday, March 17, 2025
Homeनवी दिल्लीनाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर कुणाला दोषी...
spot_img

नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर कुणाला दोषी मानता येणार नाही-सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-भावनिकरित्या अस्वस्थ झालेल्या एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्यासाठी इतर कुणाला दोषी मानता येणार नाही.नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर अशी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त करीत आहे; असे म्हणणे चुकीचे असल्याचे आज,शुक्रवारी २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.
दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने,कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला.ज्यामध्ये आरोपी कमरुद्दीन दस्तगीर सनदीला त्याच्या मैत्रिणीसोबत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.हा खटला फौजदारी खटला मानण्याऐवजी त्यांनी सामान्य ब्रेकअप केस मानून शिक्षा रद्द केली आहे. मात्र,न्यायालयापूर्वी ट्रायल कोर्टानेही आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
 
काय आहे प्रकरण👇
 
२००७ मध्ये आरोपी कमरुद्दीनने ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.यानंतर २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती.त्यानंतर तिच्या आईने तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.ट्रायल कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली,परंतु उच्च न्यायालयाने त्याला कलम ४१७ (फसवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.आरोपीचे मुलीसोबत शारीरिक संबंध असल्याचे तपासात सिद्ध होऊ शकले नाही; असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.तसेच,आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही खरा ठरला नाही; अशा परिस्थितीत मुलाला शिक्षा करणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून...

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!