Monday, January 19, 2026
Homeनवी दिल्लीनाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर कुणाला दोषी...

नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर कुणाला दोषी मानता येणार नाही-सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-भावनिकरित्या अस्वस्थ झालेल्या एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्यासाठी इतर कुणाला दोषी मानता येणार नाही.नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर अशी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त करीत आहे; असे म्हणणे चुकीचे असल्याचे आज,शुक्रवारी २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.
दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने,कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला.ज्यामध्ये आरोपी कमरुद्दीन दस्तगीर सनदीला त्याच्या मैत्रिणीसोबत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.हा खटला फौजदारी खटला मानण्याऐवजी त्यांनी सामान्य ब्रेकअप केस मानून शिक्षा रद्द केली आहे. मात्र,न्यायालयापूर्वी ट्रायल कोर्टानेही आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
 
काय आहे प्रकरण👇
 
२००७ मध्ये आरोपी कमरुद्दीनने ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.यानंतर २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती.त्यानंतर तिच्या आईने तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.ट्रायल कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली,परंतु उच्च न्यायालयाने त्याला कलम ४१७ (फसवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.आरोपीचे मुलीसोबत शारीरिक संबंध असल्याचे तपासात सिद्ध होऊ शकले नाही; असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.तसेच,आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही खरा ठरला नाही; अशा परिस्थितीत मुलाला शिक्षा करणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.. – डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा; तर हाताचे बोट छाटलेले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील...

पुढील वित्तीय वर्षासाठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे,तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार,दुर्गमता,दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर...

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात...

तक्रारदार केवळ मागासवर्गीय आहे म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही.. -अपमान करण्यामागे त्या व्यक्तीला जातीवरून नीचा दाखवण्याचा हेतू असणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा धाक दाखवून अनेकांना कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न करीत असतात.पण,कायदा हा सर्वांसाठी समान आहे.नाहक ठोस पुराव्याअभावी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!