Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील दहाव्या सत्रात मिलिंद खोब्रागडे व संतोष कपाले विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील दहाव्या सत्रात मिलिंद खोब्रागडे व संतोष कपाले विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.या उपक्रमाचे दहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३० कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे दहावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गडचिरोली येथील नवोदित कवी  मिलिंद खोब्रागडे व रायगाव (जि. बुलढाणा ) येथील शेतकरी कवी संतोष कपाले या  दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनु. “बाईपण लय भारी” व “आनंदात जगू या ” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

मिलिंद खोब्रागडे हे गडचिरोली येथील नवोदित कवी असून ते विविध संस्थातर्फे अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत, तर संतोष कपाले हे रायगाव (तालूका – लोणार सरोवर, जिल्हा- बुलढाणा) येथील रहिवासी आहेत.आजवर त्यांनी शेती व निसर्ग या विषयांवर कवितांचे लेखन केलेले आहे. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

 दहाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने विलास जेंगठे, संजय बन्सल, मुर्लीधर खोटेले,कृष्णा कुंभारे ,संतोष  कपाले, गणेश रामदास निकम,चरणदास वैरागडे,  मनिषा हिडको,तुळशीराम उंदीरवाडे,पी.डी.काटकर, पुरुषोत्तम दहिकर,पुरुषोत्तम लेनगुरे,जयराम घोंगडे, प्रेमिला अलोणे,रेखा दिक्षित,माधुरी अमृतकर,वंदना मडावी,लता शेंद्रे,प्रशांत गणवीर,प्रभाकर दुर्गे,वसंत चापले, प्रतिभा सुर्याराव, बाबाजी व्ही.हुले,उपेंद्र रोहनकर,खुशाल म्हशाखेत्री,मिलींद खोब्रागडे,सुनील मंगर, सुजाता अवचट,स्वप्नील बांबोळे, ज्योत्स्ना बन्सोड इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!