Monday, December 15, 2025
Homeनागपूरदुर्गम भागातील रस्त्यांबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत; स्वतःच दाखल केली जनहित...

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत; स्वतःच दाखल केली जनहित याचिका.. – खाटेची कावड प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही बरोबर रस्ते नाहीत,पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.वेळेवर रुग्ण सेवा पोहचत नाही.लोकप्रतिनिधी केवळ बाता झोडण्यात रुची दाखवतात.विविध प्रश्न आजही जैसे-थे असूनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.अश्यातच नुकताच भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,पण आजही देशातील असंख्य दुर्गम भागामध्ये वाहने जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यात आले नाहीत,अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोली जिल्ह्यातील एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केली.
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला येथे रस्त्याअभावी चारचाकी वाहन पोहोचत नसल्यामुळे १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी २० वर्षीय
रुनिता दुम्मा या गर्भवतीला रुग्णालयात नेण्यासाठी खाटेची कावड करावी लागली होती.रुनिता मूळची कसनसूरजवळील रेकनार गावातील रहिवासी आहे.ती प्रसूतीसाठी गोटाटोला येथे माहेरी गेली होती.तिला
प्रसवकळा सुरू झाल्याने खाटेवरून रुग्णालय गाठावे लागल्याने विविध प्रसार माध्यमांनी वृत्त प्रसारित करून दुर्गम भागातील वास्तव चित्र उघड केले होते.प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची दखल घेत यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली.त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली.या प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड.पी.आर.अग्रवाल यांनी विदर्भातील दुर्गम ठिकाणी रस्ते,वीज,पाणी इत्यादी मूलभूत सुविधा नसल्याची माहिती दिली.परिणामी,न्यायालयाने खंत व्यक्त करून याचिकेतील मुद्द्यांवर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याची राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!