उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- कुठलेही व कोणतेहीकामअसो त्यामधे कामगारांचा(मजुर) वर्गांचा संबंध प्रत्यक्षरीत्या येतच असतो.कामगार झाले म्हणून काय झाले; त्यांचीही पत,प्रतिष्ठा व इज्जत असतेच.त्यांनाही भावना असतातच.मात्र याला काहीजण अपवाद असल्याचे सत्य उद्रेक न्युजच्या दिलखुलास गप्पा- गोष्टीच्या माध्मातून कामगार बंधूंनी खाजगी मालकाच्या वागणुकीच्या किस्स्याबाबत आपले मत दिलखुलापणे मांडले आहेत.
आजच्या घडीला विविध क्षेत्रात सरकारी,निमसरकारी, कंत्राट पद्धतीवर व रोजंदारीवर पुरुष व स्त्रिया कामे करतांना दिसून येतात.कोणी कुणाच्या हाताच्या खाली काम करतो तर कुणी कुणाच्या हाताच्या वर कामे करीत असतात.रोजंदारी वर्गातील कामगार बंधू रोजची मजुरी वा हप्त्याची मजुरी घेऊन संसाराचा गाडा हकण्यात मग्न असल्याचे दिसून येते.मिळेल ते काम करणे व कुटुंब चालवणे.रोजंदारीवर कामे करतांना खाजगी मालकाच्या वागणुकीचा किस्सा कामगार बंधूंनी दिलखुलापणे सांगितला आहे.
खाजगी मालक मोठा लखपती आहे.मात्र त्याची मजुरीवर काम करणाऱ्या कामगारांना शिवीगाळ करून तुच्छ लेखत असतो.कुटुंबातील राग वा इतर राग कामगारांवर काढीत असतो.कधीही त्याचे मुखातून प्रेमाचे एकही शब्द निघत नसल्याचे कामगार बंधूंनी आपले मत व्यक्त केले.अशातच ‘अरे आम्ही कामगार आहोत; चांगले वागायला शिका! प्रेमाचे दोनच शब्द आमच्यासाठी काफी आहेत.असे दिलखुलास गप्पा-गोष्टीच्या वेळेस सांगितले.
काम करणारे झाले म्हणून काय झाले; कामगारांच्याच भरवशावर मोठ-मोठी दुकाने,बांधकामे,राईस मिल व इतर ठिकाणी कामे होतात.कामगार बंधूंनी मनात आणले तर सर्वकाही ठप्प पडू शकते.हे विसरून चालणार नाही व कामगार बंधूंना चांगली वागणूक द्या अन्यथा ‘ना घर के ना घाट के’ अशी अवस्था होणार.