Friday, November 7, 2025
Homeगडचिरोलीतरुणांनी व शेतकऱ्यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

तरुणांनी व शेतकऱ्यांनी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा,पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या व्यवसायाकडे वळावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आज,बुधवार २६ मार्च २०२५ रोजी करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग गडचिरोली,महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ मार्च २०२५ दरम्यान करण्यात आले होते.
या समारोपिय कार्यक्रमात जिल्हाधिकारी पंडा यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना मधाचे उत्पादन, मेण,राजान्न (रॉयल जेली),पोलन,प्रोपोलिस यांसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादनांमधून उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होत असल्याचे सांगितले.तसेच मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे शेतीतील फळे,फुले व भाजीपाला उत्पादनात सव्वा ते दीडपट वाढ होत असल्याचेही सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत असून हा व्यवसाय शेतीपूरक असल्याचे सांगितले.
डॉ.किशोर कि.झाडे,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर करतांना या सात दिवसांत प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक पद्धतीने मधमाशीपालनाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले.प्रशिक्षणादरम्यान तज्ञ मार्गदर्शक व मध व्यवसायिकांकडून मध,मेण, पोलन,राजान्न उत्पादनाचे विविध पैलू,बाजारपेठेतील मागणी,व्यवसायातील संधी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास पुष्पक ए.बोथीकर (पिक संरक्षण),डॉ. विक्रम एस.कदम (पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र),सूचित के.लाकडे (उद्यानविद्या),डॉ.प्रितम एन.चिरडे (कृषीविद्या),नरेश बुद्धेवर (कृषी हवामान शास्त्र) विषय विशेषज्ञ तसेच अनेक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार
 सूचित के.लाकडे यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!