Saturday, April 18, 2026
Homeलातूरझाडाखाली थांबले आठ जण; तितक्यातच कोसळली वीज.. - वीज कोसळून दोघांचा मृत्यू...

झाडाखाली थांबले आठ जण; तितक्यातच कोसळली वीज.. – वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
लातूर :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.अश्यातच आज,सोमवार २६ मे रोजी लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.त्यातच शेतातील मान्सून पूर्व मशागतीची व इतर कामे आज सोमवारी दुपारच्या सुमारास आठ मजूर करीत असतांनाच अचानकपणे पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आठही मजूर शिवारातील एका झाडाच्या आडोशाला गेले असता झाडावर वीज कोसळली.यात झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.यात
विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा  जागीच मृत्यू झाला.
अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावातील आठ मजूर आज शेतात मान्सून पूर्व मशागतीची कामे आणि शेंगा वेचण्यासाठी गेले होते.कामे करीत असतांनाच  पावसाला सुरुवात झाली.पावसापासून बचाव करण्यासाठी आठ शेतमजूर एका झाडाखाली थांबले. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली.या दुर्घटनेत विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.त्यांनी जखमी मजुरांची विचारपूस करून  सर्वांना तातडीने पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!