उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- २००४ पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर १७ लाखांच्या वर कर्मचारी मंगळवार १४ मार्च म्हणजे आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.या संपामुळे शासकीय रुग्णालये,शाळा,पंचायत समित्या,महापालिका,जिल्हा परिषदा तसेच तहसील कार्यालयांसह सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होणार झाले.तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले असून त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे.
नवीन पेन्शन योजना रद्द करणे,प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन,सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे,कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा,सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा,निवृत्तीचे वय ६० करा,नवीन शिक्षण धोरण रद्द करा,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा व इतर विविध मागण्या केल्या आहेत.
आयुष्यभर लोक काम करतात त्यामुळे त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे,असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आज विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, शेतकरी प्रश्न, किसान सभेचा लाँग मार्च या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.ही पेन्शन शेजारीच्या तीन राज्यात देण्यात आली आहे.