Friday, April 10, 2026
Homeएटापल्लीजल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- माजी...

जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली :- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे;या हेतूने शासनाच्या वतीने जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली आहे.  योजनेचा लाभ देण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावाची निवड करण्यात आली असून नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.सदर योजनेमुळे नागरिकांचा पाण्याचा खर्च कमी होणार असून स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.

 उद्घाटन प्रसंगी बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत नळाद्वारे पाणी येणार आहे.परंतु पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे.पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे असे आवाहन केले.

३८ लाख १७ हजार २४६ रुपयांच्या निधीतून जारावंडी येथे जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा काम पूर्ण केले जाणार आहे.याप्रसंगी माजी पं. स.सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहराध्यक्षा पौर्णिमा श्रीरामवार,सचिव सुमन दुर्वा,सरपंच सपना कोडापे,येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी नगरसेविका सगुणा कांदो,जारावंडी येथील उपसरपंच, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

खोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसरभवनचौक परिसरात डॉ.उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये मंगळवार,७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्फोटके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!