उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आपल्या वीज बिलात वाढ झाली,आपल्या विजेच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतले अशी शंका आपल्याला आल्यास आता थेट वीज कंपनीला फोन करण्याची मुभा वीज ग्राहकांना आहे.कारण वीज ग्राहकांनी आपल्या विजेच्या मीटरच्या रीडिंगबाबत तक्रार केली; तर एजन्सीचा माणूस न येता थेट कंपनीचा माणूस आपल्या दारात उभा राहून आपली तक्रार सोडविणार आहे.
विजेच्या मीटर रीडिंगसह अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त होत असतात.मुळात महावितरण विजेच्या मीटरचे रीडिंग घेत नाही.यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.समजा एजन्सीच्या माणसाने विजेच्या मीटरचे रीडिंग चुकीचे घेतल्या नंतर
वीज ग्राहकाने याबाबत तक्रार केली तर यातच खूप वेळ जातो.थकबाकी वाढत जातो.फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे.रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी व वेगवान केली आहे.प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीला चांगला मोबदला दिला जातो.तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत आहेत.मात्र, आता काहीच खपवून घेतले जाणार नसल्याने अश्या काही तक्रारी असल्यास थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला फोन करून समस्याचे निराकरण करता येणार आहे.