Monday, December 15, 2025
Homeगडचिरोलीग्रामीण भागातील गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर- गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे परिणाम

ग्रामीण भागातील गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर- गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे परिणाम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- रोजची रोजी-रोटी कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराने आर्थिक विवंचनेत टाकले आहे.अशातच मिळणारी सबसिडीही बंद झाली असल्याने गॅस खरेदी करावे की उदरनिर्वाह करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचा कल पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वाढलेला दिसून येतो आहे.

केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला.योजनेच्या वेळेस गॅस सिलेंडर ‘स्वस्तात मस्त’ म्हणून नागरिकांना भुरळ घातली गेली.मात्र हल्ली गॅस सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची वेळ आल्याने गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उज्ज्वला गॅस धारकांना चुलीवर परतावे लागले आहे.चुलीवरच्या स्वयंपाकामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनाचे,डोळ्याचे,फुफ्फुसाचे आजार व इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले तर वन्यप्राण्यांचा धोका आणि मोडी आणल्या तर अवैध वृक्षतोडीचा गुन्हा.यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा पेचप्रसंगात ग्रामीण भागातील जनता अडकली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!