Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीगाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान - भाग्यश्री आत्राम - येनकापल्ली येथे...
spot_img

गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – भाग्यश्री आत्राम – येनकापल्ली येथे गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आलापल्ली (गडचिरोली) :- जिल्ह्यातील तलाव व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.तलावामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास तलावांची मूळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.त्यामुळे गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येनकापल्ली येथे मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत झालेल्या गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते.यावेळी नागेपल्ली चे ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार, लक्ष्मण येर्रावार,किरण खोब्रागडे,आनंद दहागावकर,पंकज नौनूरवार,पेसा अध्यक्ष किसन सिडाम,संजय मेडपल्लीवार,सतु मेडपल्लीवार,नरेंद्र मडावी,सुरेश आत्राम, संन्याशी मडावी,सदाशिव कुमराम,कलम शाही आत्राम,भगवान आलम, बिच्चू कुमराम,साईनाथ आत्राम,तुकाराम आत्राम,दिनेश कुमराम,गणेश वड्डे, सिद्धेश्वर मडावी,महेश आलाम, नागेश आत्राम,सागर आत्राम,मधुकर कुमराम,सुधाकर आत्राम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना शासकीय यंत्रणा आणि अशासकीय संस्था यांचा योग्य समन्वय घडवून आणल्यास आणि गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना शंभर टक्के यशस्वी होऊ शकते असेही भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.एवढेच नव्हेतर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ टाकून पिकांची उत्पादकता वाढवायची आहे, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज करून गाळ मागणीची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!