Monday, May 18, 2026
Homeगडचिरोलीगाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान - भाग्यश्री आत्राम - येनकापल्ली येथे...

गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – भाग्यश्री आत्राम – येनकापल्ली येथे गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आलापल्ली (गडचिरोली) :- जिल्ह्यातील तलाव व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.तलावामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास तलावांची मूळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.त्यामुळे गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येनकापल्ली येथे मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत झालेल्या गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते.यावेळी नागेपल्ली चे ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार, लक्ष्मण येर्रावार,किरण खोब्रागडे,आनंद दहागावकर,पंकज नौनूरवार,पेसा अध्यक्ष किसन सिडाम,संजय मेडपल्लीवार,सतु मेडपल्लीवार,नरेंद्र मडावी,सुरेश आत्राम, संन्याशी मडावी,सदाशिव कुमराम,कलम शाही आत्राम,भगवान आलम, बिच्चू कुमराम,साईनाथ आत्राम,तुकाराम आत्राम,दिनेश कुमराम,गणेश वड्डे, सिद्धेश्वर मडावी,महेश आलाम, नागेश आत्राम,सागर आत्राम,मधुकर कुमराम,सुधाकर आत्राम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना शासकीय यंत्रणा आणि अशासकीय संस्था यांचा योग्य समन्वय घडवून आणल्यास आणि गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना शंभर टक्के यशस्वी होऊ शकते असेही भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.एवढेच नव्हेतर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ टाकून पिकांची उत्पादकता वाढवायची आहे, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज करून गाळ मागणीची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!