Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नगरपरिषद हद्दीतील पथ दिवे बंद स्वरूपात - नगर परिषदेने दान कर्ते...

गडचिरोली नगरपरिषद हद्दीतील पथ दिवे बंद स्वरूपात – नगर परिषदेने दान कर्ते शोधून लाईट बसवावे; रिपाईचे कार्यकर्ते दान करायला तयार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- नगर परिषद गडचिरोलीच्या मुख्य मार्गांवरील वरील पथ दिवे इंदिरा गांधी चौक,चामोर्शी मार्ग ते शासकिय विज्ञान महाविद्यालया पर्यंतची पथ दिवे गेल्या एक वर्षापासुन बंद अवस्थेत आहेत. अशातच शहरातील नागरिकांना अंधाराचा व इतर त्रासदायक सामना करावा लागत असल्याने गडचिरोली नगर परिषद डबघाईस आली असेल तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मुख्य मार्गांवरील नवीन सुरू पथ दिवे घेऊन देण्याची तयारी रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर व इतर कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्हा कॉम्पलेस मार्गावरील पथ दिवे बंद होते.परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या धसक्याने सदर मार्गावरील पथ दिवे सुरु झाले.त्या वेळेस चामोर्शी मार्गावरील सुध्दा बंद दिवे सुरु होतील असा आशा वाद व्यक्त करण्यात आला होता.मात्र अजून पावेतो चामोर्शी मार्गावरील पथ दिवे बंदच अवस्थेत आहेत.रामनवमी,हनुमान जयंती व डॉ. आंबेडकर जयंती सारखे महत्त्वाचे उत्सव असल्याने  नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. सदर मार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास शहरातील नागरिकांची मार्निंग वॉक सुरु होते.परंतु नागरिकांना मुख्य मार्गावरील अंधारामुळे चाचपत-चाचपत वाट शोधून जावे लागते.सदर मार्गांवर तिन लाईटच्या डिप्या असून त्या नादुरूस्त आहेत की काय? नगर परिषदेकडे पैसे नाहीत काय? असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत.

नगर परिषदेचे कर्मचारी कर वसुलीसाठी सकाळपासुनच घरोघरी फिरतांना दिसून येतात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी मार्गावरील बंद स्वरूपातील पथ दिवे त्वरीत दुरुस्तीकडे लक्ष घालावे किंवा पैसे नसतील तर रिपाईचे कार्यकर्ते दान करायला तयार आहोत; अशी खोचक सुचना रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!