उद्रेक न्युज वृत्त
कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रसंगी तृणधान्याचे आरोग्यातील महत्त्व पटवून देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीने गावामधून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.सदर रॅली दरम्यान कुरुड ग्रामपंचयतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम प्रामुख्याने उपस्थित होत्या.तृणधान्याचे आरोग्यातील महत्त्व यावर भूषण देशमुख कृषी पर्यवेक्षक आणि विनोद वझाडे कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी विद्याताई संजय हजारे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.