Wednesday, July 29, 2026
Homeनागपूरकाय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

काय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घराच्या अंगणात असलेल्या विहिरीचे थंड पाणी अचानक गरम येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरू लागला आहे.नागपूरच्या काटोल शहरातील नीलकंठ फुके,रा.पॉवर हाउस परिसर,काटोल यांच्या मालकीची ही विहीर असून,ती किमान ३० फूट खोल आहे.या विहिरीचे खोदकाम  फार पूर्वी करण्यात आले.विहिरीतील पाण्याचा वापर नियमित होत असल्याने पाण्याचा उपसाही होत आहे. तेव्हापासून तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या विहिरीचे पाणी थंड होते.घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे.त्यातच दोन दिवसांपासून या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पहिल्यांदा कामावरील कामगारांच्या निदर्शनास आले.शेजारच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता ते थंड असल्याचे नीलकंठ फुके यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती स्थानिक नगरपालिका प्रशासनाला दिली आहे.पाण्यातून वाफ निघत नसली तरी ते विहिरीतून काढून लगेच आंघोळीसाठी वापरण्याजोगे कोमट असून पाण्याला कुठलाही गंध नाही.त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे,हे तपासणी अंतीच कळणार आहे.काहींच्या मते हा भूगर्भातील काही हालचालींचा परिणाम असावा,तर काहींनी गरम झरे किंवा जिओथर्मल ॲक्टिव्हिटीची शक्यता व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!