Friday, April 10, 2026
Homeनागपूरकाय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

काय सांगता..? घराच्या अंगणात असलेल्या विहिरीतील थंड पाणी येऊ लागले गरम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घराच्या अंगणात असलेल्या विहिरीचे थंड पाणी अचानक गरम येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरू लागला आहे.नागपूरच्या काटोल शहरातील नीलकंठ फुके,रा.पॉवर हाउस परिसर,काटोल यांच्या मालकीची ही विहीर असून,ती किमान ३० फूट खोल आहे.या विहिरीचे खोदकाम  फार पूर्वी करण्यात आले.विहिरीतील पाण्याचा वापर नियमित होत असल्याने पाण्याचा उपसाही होत आहे. तेव्हापासून तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या विहिरीचे पाणी थंड होते.घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे.त्यातच दोन दिवसांपासून या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पहिल्यांदा कामावरील कामगारांच्या निदर्शनास आले.शेजारच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता ते थंड असल्याचे नीलकंठ फुके यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती स्थानिक नगरपालिका प्रशासनाला दिली आहे.पाण्यातून वाफ निघत नसली तरी ते विहिरीतून काढून लगेच आंघोळीसाठी वापरण्याजोगे कोमट असून पाण्याला कुठलाही गंध नाही.त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे,हे तपासणी अंतीच कळणार आहे.काहींच्या मते हा भूगर्भातील काही हालचालींचा परिणाम असावा,तर काहींनी गरम झरे किंवा जिओथर्मल ॲक्टिव्हिटीची शक्यता व्यक्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११...

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!