Tuesday, March 18, 2025
Homeनागपूरकापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार- नराधमांनी हत्येनंतरही केला बलात्कार - नागपूर जिल्ह्यातील...
spot_img

कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार- नराधमांनी हत्येनंतरही केला बलात्कार – नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर : – कापूस वेचणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.हत्या केल्यानंतरही तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरेवानी गावात काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह शेतात बेवारस अवस्थेत आढळूनआला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.या प्रकरणात तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती.ती शेतात एकटी असल्याचे पाहून तीनजण तिच्याजवळ आले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून या तिघांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.महिलेने यास विरोध करताच तिघांनी महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.यावरच न थांबता त्या तिघांनी तिची कुन्हाडीने वार करत हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावरही सामूहिक बलात्कार केला.तिच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली असून,तो सध्या कारागृहात असल्याने ती शेतीची कामे करत होती.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!