Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता; आणखी एकाने संपवली जीवनयात्रा..!

ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता; आणखी एकाने संपवली जीवनयात्रा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-नुकतेच तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील ३५ वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या कारणावरून मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता आणखी एकाने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची चिंता व आपल्या दोन मुलींचे पुढे काय होणार? या विवंचनेतून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सदरची घटना बीड जिल्ह्याच्या नाथापूर गावात काल शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.गोरख नारायण देवडकर वय ५० वर्षे असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून गोरख देवडकर यांना पाच मुली आहेत.तीन मुलींचे लग्न झाले,त्यापैकी दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा वाढून आपल्या मुलींना नोकरी मिळेल कशी?असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून सोडत होता.त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलींसोबत संवाद साधून खंत व्यक्त केली होती आणि त्याच रात्री जीवनयात्रा संपवील्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या कारणावरून राज्यातील ही दुसरी घटना असल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!