- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बुलढाणा :-ऐन होळी सणाच्या दिवशीच एका युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवारी १३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे उघडकीस आली आहे.कैलास अर्जुन नागरे वय ३८ वर्षे,रा.शिवनी आरमाळ,ता.देऊळगाव राजा,जि.बुलढाणा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सदर शेतकऱ्यास राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला होता.आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्यामुळे शासनाच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलत असल्याचे लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.कैलास नागरे हे एक प्रगतीशील शेतकरी होते. त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आज होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांसाठी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक तीन ते चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.त्यात त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी याची पुष्टी केली आहे. कैलास नागरे गत अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा पुकारला होता.गत डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवसांचे अन्नत्याग आंदोलनही केले होते.पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.अखेर नागरे यांनी आज टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
- Advertisement -

