- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे आणि नंदुरबार जिल्हे),मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे),पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस कोसळलेला नाही.अश्यातच उद्या, बुधवार ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून,ही परिस्थिती किमान पुढील दहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.तसेच,राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार,जुलै महिन्याच्या सुरुवतीपासूनचा पाऊस आणि पुढील अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही,तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये,असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
- Advertisement -

