- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज वर्तविला आहे.उद्या,शुक्रवार १३ मार्च ते १५ मार्चपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून कमाल तापमानातील चढउतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.बहुतेक जिल्हे उन्हाच्या झळांनी त्रस्त आहेत.तीन दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले अकोल्याचे तापमान अद्यापही जास्त आहे.काल,
बुधवारी अकोल्यात ४१ अंश तापमान नोंदवण्यात आले, तर अमरावतीत ४०.४ अंश आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरातही तापमान ४० अंशापर्यंत गेले आहे. नागपूरमध्ये तापमान ३८.४ अंश नोंदवण्यात आले,जे सरासरीपेक्षा ३.२ अंश अधिक आहे.त्यातच,चंद्रपूर ३८.२ अंश,तर वर्धा,वाशिम आणि बुलढाणा ३९ अंश सेल्सीअस सरासरीत आहेत.समजा,उन-पावसाचा खेळ सुरू राहिला तर जीवाची लाही-लाही झाल्याशिवाय राहणार नाही.कारण की,पुढील महिने ही तपोवनातील उष्ण तापमानाची असतात.त्यामुळे,नागरिकांनी उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे.
- Advertisement -

