- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात.या योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात.दरम्यान,आतापर्यंत या योजनेत १८ हप्ते देण्यात आले आहेत.आता लवकरच १९ वा हप्ता मिळणार आहे.शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान,पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे. याबाबत केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे.
पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात देण्यात आला होता.त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत.या योजनेत आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.मात्र,ज्यांची ई-केवायसी झालेली आहे; अश्यांच्याच खात्यात रक्कम जमा होणार आहे.
- Advertisement -

