- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गोर गरिबांना सणावारांना मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ सरकारच्या यादीतून बाद झाला असतांनाच पुढील नंबर तोही गोर गरिबांच्या शिवभोजन थाळीवर लागणार की काय?अशी निदर्शनास येऊ लागले आहे.शासन योजना सुरू करते खरी,पण पैश्याचा ठणठणाट अभावी सुरू केलेल्या योजनांवर कात्री लावली जाते.शिवभोजन थाळी दहा रुपयांत मिळते.दहा रुपयाच्या जेवणात गोरगरीब जनतेला दोन पोळ्या,एक वाटी भात,एक वाटी वरण व एक वाटी भाजी दिली जाते. राज्य शासन शिवभोजन केंद्र चालकांना शहरी भागात प्रति थाळी ५० रुपये तर ग्रामीण भागात ३५ रुपयांचे अनुदान देते.त्यानुसार राज्याच्या विविध जिल्ह्यात शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली असून गडचिरोली-१४,गोंदीया-१०,चंद्रपुर-२२,नागपूर-३४, पुणे-९७, अमरावती-२३,औरंगाबाद-१८,बीड-२४, बुलढाणा-१७,धुळे-१५,अहमदनगर-२९,अकोला-१३, हिंगोली-९,जळगाव-३८,जालना-१५,कोल्हापूर-३७, लातूर-२०,नांदेड-२२,नंदूरबार-१३,नाशिक-४५, उस्मानाबाद-१२,पालघर-१३ व परभणी-१२,असे एकूण राज्यात १ हजार ९०४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. केंद्रनिहाय थाळीची मर्यादा देण्यात आली असून दर महिन्याला अनुदान दिले जाते.मात्र,ही योजनाच आता आर्थिक अडचणीत आली आहे.गेल्या वर्षभरापासून या योजनेचे अनुदान रखडण्यास सुरुवात झाली आहे. प्रारंभी महिन्याचे अनुदान रखडत होते,नंतर ते दोन महिन्याचे रखडत गेले.सध्या राज्यात एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे अनुदान रखडले आहे.राज्य शासन ही योजना बंद होणार नाही,असे म्हणत असले तरी वेळेत अनुदान मिळत नसल्याने काहींनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजनाही बंद होण्याच्या मार्गावर आहे.
- Advertisement -

