Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'पीएम किसान' योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला... - 'या' लाभार्थ्यांचा होणार...

आता ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला… – ‘या’ लाभार्थ्यांचा होणार पत्ता कट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा,या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले.त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली.तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत.या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे.ज्यावेळी ही योजना सुरू झाली,त्यावेळी एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते.त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. मात्र,आता पीएम किसान’ योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करतांना पती,पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.त्याचबरोबर वारसान हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे; त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर,इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात,जे पेन्शनधारक आहेत,त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता.हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत.१९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी करू शकते.मात्र,सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!