Monday, July 13, 2026
Homeमुंबईआता एका क्लिकवर मिळणार उद्योगांच्या सर्व परवानग्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता एका क्लिकवर मिळणार उद्योगांच्या सर्व परवानग्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा,वीज,रस्ते व कनेक्टिव्हिटी, पर्यावरण मंजुरी,वन परवानग्या,मजूर कायदे,जमीनचे वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्‍ध करून दिल्या पाहिजे.उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे,यासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात. त्याचबरोबर, उद्योजकांना शासकीय विभागांशी काही अडचणी असतील,तर त्यासंदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा तयार करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज,बुधवार ३० जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित मुद्यांवर बैठक झाली.या बैठकीस बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल,राज्यमंत्री मेघना बोर्डीकर,मुख्य सचिव राजेशकुमार,वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर,ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला,कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन,उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बळगन, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू,विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्यासह अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,उद्योगांकरिता त्यांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे.माजलगाव,दिघी,बुटीबोरी,चामोर्शी (गडचिरोली), जयपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि पीएम मित्रा(अमरावती) येथे वीज सबस्टेशनच्या उभारणी कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.उद्योगांसाठी वीज वहन आणि देखभालीच्या समस्या येत असल्याने त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी.पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या मैत्री या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्या.त्याचप्रमाणे,सार्वजनिक बांधकाम विभागाने शेद्रा बिडकीन मार्गाला समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावे.नवीन उद्योगांनी बुटीबोरी येथे जास्त पसंदी दिली असल्याने या भागातील रोड कनेक्टिव्हिटी तात्काळ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केल्या.
राज्यातील उद्योगांना कॉन्सेंट टू इस्टब्लिश व कॉन्सेंट टू ऑपरेट परवानग्या वेळेवर मिळाल्या पाहिजे,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,उद्योगांना लागणाऱ्या अनावश्यक परवानग्या बंद कराव्यात.उद्योग प्रतिनिधीच्या अनाहूत तपासण्या बंद कराव्यात. उद्योगांना जमीनी देण्यासंदर्भात वेगवेगळे निर्णय आणि परिपत्रक असल्याने ते सुधारित करून एकत्रित करण्यात याव्या.उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी,अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,महाराष्ट्राच्या ज्या भागात एमआयडीसी आहेत,त्या भागाला औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यात यावा.औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास दुबार करासारखी समस्या निकाली निघेल. उद्योगांना देण्यात येणार पात्रता प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीच्या संपादनासंबंधी तसेच विविध औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व प्रस्तावित भूसंपादनाची सविस्तर माहिती घेतली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!